Modi Government | मोदी सरकारकडून झटका ! ‘या’ योजनेत 1 ऑक्टोबरपासून ‘हा’ नियम लागू, पुन्हा बदल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) अटल पेन्शन योजनेत (APY) मोठा बदल केला आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे (Atal Pension Yojana Calculator). अटल पेन्शन योजनेतील या बदलामुळे प्राप्तीकर भरणार्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू होईल. प्राप्तीकर भरणार्या नागरिकांचे अटल पेन्शन खाते बंद होईल. त्यातील रक्कम संबंधीत ग्राहकाच्या बचत खात्यात जमा करण्यात येईल. (Modi Government)
नवीन नियमानुसार, प्राप्तीकर भरणार्यांना अटल पेन्शन योजनेचे खाते उघडता येणार नाही.
हा नियम प्राप्तीकर भरणार्यांसाठी मोठा झटका आहे.
निवृत्तीनंतर सुरक्षित जीवनासाठी अटल पेन्शन योजना हा अनेकांसाठी चांगला पर्याय होता.
आता सरकार वेळोवेळी नागरिकांच्या खात्याचा तपशील तपासणार आहे.
यापूर्वी 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येत होता.
आता त्यावर सरकारने मर्यादा आणल्या आहेत. (Modi Government)
सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्ही भारताचे नागरिक असाल, तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल, तर तुम्ही एपीवाय साठी अर्ज करु शकता.
अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक केल्यानंतर,
निश्चित वयोमर्यादेनंतर दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे.
पेन्शन फंड रेग्युलेटरच्या आकडेवारीनुसार, या योजनेत 4 कोटींहून जास्त ग्राहक जोडले गेले.
2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी लोकांनी एपीवाय खाती उघडली.
31 मार्च 2022 पर्यंत योजनेच्या ग्राहकांची संख्या 4.01 कोटी झाली आहे.
ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरु केली होती.
असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी योजना होती.
नंतर त्यात बदल करून 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिकासाठी ती खुली करण्यात आली.
आता नवीन नियमानुसार प्राप्तिकरदाते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
Web Title : – Modi Government | atal pension yojana big blow to the taxpayers the government made changes in the atal pension yojana rules changed for the second time
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update