खळबळजनक ! प्रेमविवाहानंतर पती-पत्नीत असं काही घडलं, नवर्‍यानं उशीनं तोंड दाबून बायकोचा केला खून, स्वत:हून गुन्हा केला कबूल

बुलडाणा : ऑनलाइन टीम – प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामध्ये काही महिन्यातच किरोकोळ कारणावरुन वाद सुरु झाले. याच वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीचे उशीने तोंड दाबून खून केला. ही खळबजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह समोसा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संजीवनी शिवाजी आढाव (वय-22) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शिवाजी कैलास आढाव (वय-28 मुळ रा. काकनवाडा, ता. संग्रामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजीवनी आणि शिवाजी हे दोघे आरोग्य कॉलनीत भाड्याने खोली घेऊन रहात होते. या दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत होते. गुरुवारी देखील त्यांच्या मध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. यावेळी आरोपीने रागाच्या भरात पत्नी संजीवनी हिच्या तोंडावर उशीने जोरात दाबून तिचा निर्घृण खून केला.

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने मध्यरात्री पोलीस ठाणे गाठले. त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मृत महिलेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.शहर पोलिसांनी रात्री अडीचच्या सुमारस माहिती दिल्यानंतर मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी रुग्णालयात धाव घेतली.

मृत महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी संजीवनी आणि आरोपी शिवाजी यांचा काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, आरोपीला दारुचे व्यसन असल्याने तो मुलीला नेहमी त्रास देत होता. तसेच तिला मारहाण देखील करत होता. यापूर्वी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी दोघामध्ये समेट घडवून आणले. त्यानंतर त्यांचा संसार सुरळीत सुरु झाला होता. मात्र, काल रात्री अचानक त्यांच्यात झालेल्या वादातून पतीने टोकाचे पाऊल उचल पत्नीचा खून केला. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.