दिलासादायक ! ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत घट, रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील 24 तासांमध्ये 7 हजार 345 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत एकूण 17 लाख 30 हजार 715 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 93.28 टक्के इतके झाले आहे. आज (सोमवार) राज्यात 3 हजार 75 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर 2.57 टक्के इतका आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 13 लाख 18 हजार 721 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 18 लाख 55 हजार 341 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात5 लाख 55 180 व्यक्ती होम क्वारंटाइन झाले आहेत. तर 5 हजार 565 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या 75 हजार 767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 3075 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 55 हजार 341 इतकी झाली आहे.