PM मोदींच्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मधील 10 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी (दि.27) 2020 मधील शेवटच्या ‘मन की बात’ मधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, स्वच्छ भारत अभियान, कोरोना ते लोकल फॉर वोकल अशा अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. त्याच बरोबर मोदींनी काश्मिरी केशर, अकबराचा दरबार, गुरु गोविंद सिंह आणि गुरु तेग बहादूर यांचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी वर्षा शेवटच्या ‘मन की बात’मधून (Mann ki Baat) जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशवासीयांनी नव्या वर्षानिमित्त देशात तयार होणाऱ्या वस्तूची खरेदी करण्याचा संकल्प करावा. व्होकल फॉर लोकल हा स्वर आता घरा घरात घुमत आहे. त्यामुळे, आपल्या वस्तू जागतिक स्तरावरील असाव्यात हे, आपल्याला निश्चित करायचे आहे. जागतिक स्तरावर जे बेस्ट आहे, ते आपण भारतात तयार करुन दाखवू. यासाठी आपल्या उद्योजक सहकाऱ्यांना पुढे यावे लागले.कोरोनामुळे जगातील सप्लाय चेनमध्येही अनेक अडथळे आले. मात्र, प्रत्येक संकटापासून आपण नवा धडा घेतला. देशात नवे सामर्थ्यही निर्माण झाले.

मी आपल्याला आग्रह करतो, की आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी वापरतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना ? यासाठी या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. आणि भारतीयांच्या कष्टाने तयार झालेल्या वस्तू वापरण्याचा संकल्प करा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकबराच्या दरबारातील अबुल फजल यांच्या नावाचाही उल्लेख केला आणि एक वाक्यही सांगितले.

काश्मिरी केशर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. केशर काश्मीरचे एक वेगळेपण आहे. या केशरची गुनवत्ता अत्यंत चांगली आहे.

आज गुरु गोविंद सिंहांच्या आईचा हुतात्मा दिन आहे. काही दिवसांपूर्वी मी गुरु तेग बहादूर यांच्या दरबारात माथा टेकवला होता.

भारताने 2014-2018 दरम्यान बिबट्यांच्या संख्येत 60 टक्के वृद्धी झाल्याचे पाहिले आहे. 2014 मध्ये भारतात बिबट्यांची संख्या 7900 होती. ती 2019 मध्ये 12852 इतकी झाली आहे. मध्य भारतात बिबट्यांची संख्या वाढली आहे.

मला अनेक देशवासियांचे पत्र मिळाले आहेत. अधिकांश पत्रात लोकांनी देशाचे सामर्थ्य आणि देशवासियांच्या ऐक्याच्या शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजूट दाखवली, हे देखील लोकांनी लक्षात ठेवल्याचे मोदींनी सांगितले.

मी नव्या वर्षासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा देतो. आता पुढील वर्षी जानेवारीमध्ये मन की बात होईल, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.