लासलगाव मध्ये जनता कर्फ्युची घोषणा

लासलगाव – कोरोनाचे रुग्ण संख्या दररोज वाढत असल्याने कोरोना रूग्णांची साखळी तोडण्यासाठी लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगावमध्ये जनता कर्फ्युची घोषणा केली आहे.

लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर,उपसरपंच अफजल शेख ,ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरीकांना लासलगाव परीसरात कोविड – १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने १९ एप्रिल पासुन २५ एप्रिल पर्यंत दवाखाने आणि मेडिकल सोडून इतर संपुर्ण व्यवसाय बंद ठेऊन सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे

वरील तारखेदरम्यान फक्त आत्यवश्यक सेवाच चालु राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतीरीक्त सर्व दुकाने, भाजीपाला हे बंद ठेऊन सहकार्य करावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व गावाच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे.तसेच या दरम्यान बाहेर कोणीही ररस्त्यावर विनाकारण फिरू नये. असे जाहीर आवाहन कोरोना नियंत्रण समिती व सरपंच जयदत्त होळकर यांनी केले आहे.

जनता कर्फ्यु दरम्यान नागरीकांनी बाहेर पडू नये व कोरोनाची साखळी तोडण्यास व गावाच्या सुरक्षेतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी करून विनाकारण फिरताना आढळताच दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे