Pune : मास्क का लावला नाही? औंध परिसरात तरूणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – औंध भागात पाण्याचे जार घेऊन आलेल्या तरुणाने मास्क न लावण्यावरून सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी महिंद्र बापू ससाने (वय 21, रा. आनंद पार्क, काटेपुरम चौक, कृष्णाई, पिंपळे गुरव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बाबा शेख व इतर पाच ते सहा जणांवर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिण्याच्या पाण्याचे जार विक्री करणे व पुरवठा करतात. सोमवारी रात्री ते पाण्याचे जार घेऊन औंध परिसरात गेले होते. जार ठेवून परत घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. तसेच, मास्क का लावला नाही व लघुशंकेसाठी येथे का थांबला यावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाडकडी बाबूने बेदम मारहाण केली. यावेळी मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्याही मनात दहशत निर्माण केली. अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.