सलमान आणि आमिर खान हे ढोंगी, अनिल कपूर म्हणाला – ‘या’ पध्दतीने दुसर्‍या अभिनेत्यांना बनवतात ‘उल्लू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर नुकताच ‘पागलपंती’ चित्रपटात पडद्यावर विनोद करताना दिसला होता. या संदर्भात त्यांनी गोव्यातील चालू असलेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक अनीस बाझमी यांच्याशी झालेल्या पॅनेल चर्चेत भाग घेतला. या संभाषणादरम्यान अनिल कपूरने सलमान खान आणि आमिर खानविषयी मोठा खुलासा केला आणि म्हटले की, हे दोन सुपरस्टार इंडस्ट्रीतील कलाकारांना उल्लू बनवतात.

या पॅनेल चर्चेदरम्यान, अनिल कपूर यांना हा प्रश्न विचारण्यात आला की, फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स सुरुवातीला कार आणि घर विकत घेतल्यानंतर आळशी का होतात? नंतर ते काम गांभीर्याने का करत नाहीत. चित्रपटसृष्टीत तुमच्या नजरेत कोणते कलाकार आहेत असे तुम्हाला वाटते का?

या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाला की, “मी आपल्याशी सहमत आहे. सुरुवातीला बरेच कलाकार चांगले काम करतात पण नंतर आळशी होतात. काम आणि मेहनत इतक्या गंभीरतेने घेत नाही. आता पहा आमिर खान स्वतःला आळशी म्हणतो. प्रत्यक्षात मात्र तसे नसते. ही आमिरची चाल आहे. आमिर वारंवार आळशी असल्याचा दिखावा करतो. तो इतर कलाकारांसमोर जाणीवपूर्वक स्वत: ला असे वारंवार सांगतो की, तो आळशी आहे मग बाकीचे कलाकार विचार करतात की आमिर आळशी असताना देखील काम करतो. पण सत्य हे आहे की, आमिर खूप मेहनत करतो आणि सर्वात जास्त काम करतो.

अनिल कपूरने सलमानशी संबंधित एक किस्सा शेअर करुन सांगितले की, “जेव्हा मी सलमानबरोबर फ्लाइटमध्ये प्रवास करतो तेव्हा सलमान नेहमी चांगले भोजन आणि स्वीट डिश मागवत असतो, जेणेकरून मी देखील सलमानबरोबर प्रभावित होऊ चांगले जेवण मागवेल. पण प्रत्यक्षात सलमान स्वत: क्वचितच असे चांगले पदार्थ खातो पण मी त्याच्या शैलीने प्रभावित झालो नाही पण इतर स्टार प्रभावित होऊन असा विचार करतात की, सलमान चवदार अन्न खाऊन देखील अतिशय हॅंडसम आहे. पण सलमानचा उद्देश दुसऱ्या अभिनेत्यांना उल्लू बनविण्याचा असतो.

अनिल कपूर म्हणतो की, “सलमान खान आणि आमिर खान स्मार्ट पद्धतीने ढोंग करतात, जेणेकरून इतर कलाकार त्यांच्या स्पर्धेत मागे राहतील.”

Visit : Policenama.com