शेतकर्‍यांना राम, राम म्हणा अन् गुन्हेगारांचे राम नाम सत्य करा !

मेरठः वृत्तसंस्था – कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनात शेतकरी नेत्यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शेतक-यांना राम, राम आमि राम नाम सत्यचे वक्तव्य त्यांनी केले आहे. रविवारी मेरठमध्ये झालेल्या रॅलीत ते म्हणाले होते की, जेंव्हा शेतक-यांना भेटाल तेंव्हा राम राम म्हणा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, शेतक-यांसोबत अन्याय होणार नाही. आम्ही पोलिसांना आदेश दिले आहेत की ज्यावेळी शेतकरी बांधवाची भेट होईल, तेंव्हा त्यांच्याशी बोलताना राम, राम म्हटले पाहिजे. तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार करणा-या आणि सुरक्षेला धोका निर्माण करणा-या गुन्हेगारांचे रामनाम सत्य झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, शेतकरी बांधवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकतेला आवाहन दिले जात आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे काम केले जात आहे. हे कधीच सहन केले जाणार नाही. कोणताही प्रश्न हा संवादाने सुटेल, संघर्षाने नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो त्याच्या पीकाचा आणि उत्पादनाचा मालकही असतो. त्याला त्याचे माल कुठे विकायचा याचे अधिकार आहे. त्यावर बाजारात अथवा बाजाराबाहेर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ नये, असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे योगी आदिनाथ म्हणाले.