प्रवाशांनी पुणे विमानतळावर ३ तास आधी पोहचावे, विमानतळ प्रशासनाचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमानाने प्रवास करणाऱ्या पुण्यातील सर्व प्रवाशांनी विमानतळावर विमानाच्या वेळेच्या तीन तास आगोदर पोहचावे असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर तसेच जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थितीनुसार पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. विमानतळावरील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची ही कसून तपासणी केली जात आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडून प्रवाशांसह विमानांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दलाच्या जवानांची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे. विमानामध्ये प्रवाशांची कसून तपासणी करण्याच्या सुचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तपासणी दरम्यान बेल्ट, घड्याळे, बुट काढण्यास सांगितले जात असल्याने तपासणीसाठी वेळ लागत आहे.

ब्युरो ऑफ सिव्हील अ‍ॅव्हीएशन सिक्युरिटीने (BCAS) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येते. मात्र, यंदा जम्मु व काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्याने तणावाची स्थिती आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वाढवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था ३१ ऑगस्ट पर्यंत कायम राहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त