धक्कादायक… दिसायला सावळी असल्यामुळे विवाहितेला जाळले

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन 
दिसायला सावळी  आणि लग्नात हुंडाही न दिल्यामुळे विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. याप्रकरणी पती संगम आणि सासू लीलावती यांच्यावर हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात संगम वायले याच्या बरोबर वैशालीचा विवाह झाला होता. वैशालीला दिड वर्षांचा मुलगा ही आहे. मात्र विवाह प्रसंगी मानपान न केल्याने आणि दागिने न दिल्याने तिचा पती संगम आणि सासू लिलाबाई वैशालीचा अतोनात छळ करत होते. तू दिसायला सावळी आहे मला शोभत नाही. तुझ्या घरच्यांनी आम्हाला ठरल्या प्रमाणे हुंडाहि दिला नाही, या कारणावरुन वैशालीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. अखेर २० जुलै च्या मध्यरात्री वैशालीला तिच्या पती आणि सासूने जिवंत पेटवले. इतकेच नव्हे तर  तिला जिवंत जाळल्यावर तिच्या सासरच्यांनी वैशालीने स्वतः पेटवून घेतल्याचे वैशालीच्या घरच्यांना सांगितले.
[amazon_link asins=’B07B4QWMG3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c6e9aa5-901b-11e8-92d5-014558a1dbb4′]
यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांना थोडा संशय आला होता. त्यांनी वैशालीचा मृतदेह मुंबईला पाठवला तिथे तिच्या अंगावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसात पती संगम आणि सासू लीलावतीच्या विरोधात हत्येचा आणि हुंडा बळीचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.