खळबळजनक ! सोलापूर जिल्हयात एकाच कुटुंबातील चौघाची आत्महत्या

बार्शी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले आहे. शहरातील अलिपूर येथे एकाच कुटुंबाने आत्महत्या केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबीयांत ही दु:खद घटना घडली आहे. पती-पत्नीने मुलांना विष पाजून स्वत: विष पिऊन आत्महत्या केली.

मृतांमध्ये चारजणांचा समावेश असून भैरवानाथ शिवाजी कोकाटे (वय-40), मनिषा भैरवनाथ कोकाटे (वय- 36), प्रशांत कोकाटे (वय-15) आणि प्रतिक्षा कोकाटे (वय -11) अशी मृतांची नावे आहेत. संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. बार्शी शहरातील अलिपूर रोड परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर मठाजवळ भैरवानथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमेवत आत्महत्या केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बार्शी शहर हादरून गेले आहे. तर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.

Visit : policenama.com