स्मार्ट सिटी ही केवळ योजना नव्हे तर मिशन- पंतप्रधान

 लखनौ : वृत्तसंस्था

स्मार्ट सिटी उभारणी ही एक सरकारी योजना नसून ते मिशन आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्याला देशात परिवर्तन घडवायचे आहे. २१ व्या शतकातील  आव्हाने स्वीकारण्यास शहरे सज्ज व्हावीत, ही शहरे बौद्धिक संपदेची केंद्र व्हावीत असे उद्दीष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cea5a806-9272-11e8-8de4-6f5d5193fc78′]

शहरात सुविधा उभारणीसाठी पर्यायी निधी उभा केला जात आहे असे सांगताना मोदी यांनी पुणे, इंदूर, हैद्राबाद महापालिकांनी रोखे निर्माण केल्याचा उल्लेख केला. या शहरांनी ५५० कोटीचा निधी रोखे द्वारा उभे केल्याची  माहितीही यावेळी पंतप्रधानांनी दिली.