‘या’ कारणामुळं भारतात येणारी प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करा : पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी काही वर्षांत कोरोना संसर्गाच्या छोट्या स्वरूपाच्या लाटा येत राहातील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही. समजा तशी लाट आलीच तर ती खूप गंभीर स्वरूपाची असणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन सुचवलं आहे.

भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा… माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण
कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. ”विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.”, असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे, भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा. दरम्यान, कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे, भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितलं, की देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असं दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकतं. इतके रुग्ण असल्यानं व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्यानं संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही. मात्र, अद्यापही कोरोनाच धोका असल्याने लोकल, शाळा आणि काही आस्थापने बंदच आहेत.