‘या’ कारणामुळे मिस यूनिवर्स स्पर्धेमध्ये सुष्मिता सेन ऐवजी ऐश्वर्याला पाठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनने १९९४ मध्ये मिस यूनिवर्स स्पर्धेचे काही खास किस्से यांचा खुलासा केला आहे. सुष्मिताने सांगितले की, एक वेळ अशी होती. जेव्हा मला वाटले की, ब्रह्मांड सुंदरी बनण्याचे स्वप्न तुटते की काय? त्यावेळी माझी स्थिती खुपच वाईट झाली होती. त्यावेळी असे झाले की, सुश्मिता सेनचे पासपोर्ट हरविले होते. तेव्हा सुष्मिताने सांगितले की, तिचे पासपोर्ट लवकर तयार होणे खुपच अवघड आहे आणि मिस यूनिवर्स कॉन्टेस्ट लवकरच सुरु होणार आहे. अशामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री एश्वर्या रॉयला मिस यूनिवर्स स्पर्धेमध्ये जाऊ द्या.

एका मुलाखतीत सुष्मिता विचारले की, मिस यूनिवर्स स्पर्धेमध्ये जाण्याआधी काही दिवसांपुर्वी तुझा पासपोर्ट हरविला होता? सुष्मिता सेनने सांगितले की, पासपोर्ट हरविले नसून ते अनुपमा वर्माला दिले होते. त्यावेळी ती प्रसिद्ध मॉडेल आणि इव्हेंट कोर्डिनेटर होती. मिस यूनिवर्सच्या स्पर्धेमध्ये जाण्यच्यावेळी सुष्मिताला जेव्हा मिस इंडियाच्या टिमने पासपोर्ट मागितले तेव्हा तिने विश्वासाने सांगितले तिचे पासपोर्ट अनुपमा वर्माकडे आहे. जेव्हा अनुपमा वर्मा यांनी पासपोर्ट शोधण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना भेटले नाही.

पासपोर्ट नसल्याने सुष्मिता खूप निराश झाली. ती तिच्या वडिलांजवळ जाऊन रडायला लागली. तेव्हा मिस इंडियाच्या टिमने तिला सांगितले की, मिस यूनिवर्सच्या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या रॉयला जाऊ दे. त्यावेळी सुष्मिताला कोणत्याच स्पर्धेमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. यानंतर सुष्मिताने स्पष्ट सांगितले की, यानंतर एश्वर्यासोबत माझा कोणत्याच प्रकारे वाद झाला नाही.