53 वर्षानंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा TATA समुहाकडे येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समूहाने (TATA) संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी टाटा समूहाने मागील आठवड्यातच प्रस्ताव (Expression of Interest) दिला आहे. ही डील पक्की झाली तर एअर इंडियाची 53 वर्षानंतर घरवापसी होईल. ही कंपनी 88 वर्षापूर्वी जेआरडी टाटा यांनी स्थापन केली होती. टाटाने यासाठी एअर एशियाचा उपयोग केल्याचे बोलले जात आहे. यात टाटा सन्सची हिस्सेदारी आहे.

मोदी सरकारने 2018 मध्ये एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep singh puri) यांनी एअर इंडियाचे खासगीकरण केले नाही तर कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण ही एक गोपनिय प्रक्रिया आहे. यासंदर्भातील माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे त्यांनी रविवारी म्हटले होते.

जेआरडी टाटांनी केली होती एअर इंडियाची स्थापना
सन 1932 मध्ये जेआरडी टाटा यांनी या विमान कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर 1946 मध्ये राष्ट्रीयीकरण होऊन तिचे नाव एअर इंडिया झाले. सुरुवातीला तिचे नाव टाटा एअरलाइन्स होते. राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर तिचे नाव एअर इंडिया ठेवण्यात आले. सध्याच्या घडीला ही कंपनी कर्जबाजारी असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.