Thalaivi चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कंगना रनौतला अश्रू अनावर, म्हणाली – ‘आठवत नाही शेवटच्या वेळी कधी रडले’

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करते आणि कधीही मागे फिरत नाही. तिला एक सशक्त अभिनेत्री म्हटले जाते. तिच्या विधानाने भल्याभल्यांना रडू येईल, पण थलाइवी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. कंगना रनौत खूप भावनिक झाली आणि तिला रडू कोसळले.

https://twitter.com/AnytimeGorgeous/status/1374256704657915906

थलाइवीच्या ट्रेलर लॉन्चवेळी कंगना रनौत या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे कौतुक करत होती. तिने सांगितले की, विजयने कशा प्रकारे तिच्या टॅलेंटची पारख केली आणि नेहमी मोटिवेट केले. याविषयी बोलताना कंगना भावूक झाली आणि तिला रडू आले. यानंतर कंगना जास्त बोलू शकली नाही आणि आपल्या सीटवर जाऊन बसली. आता कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना एका चाहत्याने लिहिले की, थलाइवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजयबद्दल बोलताना कंगना खूप भावूक झाली. कंगनानेही ही पोस्ट शेअर केली.

कंगनाने ट्विट केले आणि लिहिले- “मी स्वत: ला बब्बर शेरनी म्हणते कारण मी कधीही रडत नाही. मी कोणाला रडविण्याचा हक्क देत नाही. शेवटच्या वेळी मी कधी रडले हे आठवत नाही. पण आज मी रडले, खूप रडले आणि ते खूप चांगले होते. #ThalaiviTrailer

चित्रपटाविषयी बोलताना कंगना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिताच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच पसंत केला गेेला. ट्रेलरमध्ये कंगनाने जयललिताची मजबूत बाजू दाखविली आहे.