ते म्हणाले की, शिर्डीची जागा युतीच्या जागावाटपात सेनेकडे आहे. सेनेकडे उमेदवारी मागताना भाजपने दिलेले पद का सोडले नाही ? तुम्ही अपक्ष उमेदवारी करू म्हणता, इथे सगळे कार्यकर्ते मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करत असताना वाकचौरे युतीच्या उमेदवाराविरुद्ध लढण्याची गोष्ट करतात. म्हणजे वैयक्तिक स्वार्थ हेच त्यांचे राजकीय तत्वज्ञान आहे. ते जेव्हा सेनेतून काँग्रेस मध्ये आले व पडले . त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्री विखे पाटलांनी त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळावर घेतले. मात्र पुन्हा काँग्रेस सोडून भाजपात उमेदवारी करताना त्यांनी विद्यापीठाचे पद सोडले नाही. माझ्या पक्ष प्रवेशास त्यांनी विरोध केला. वास्तविक मी आजही पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नाही. तरीही मला स्पर्धक मानून वाकचौरे मला विरोध करीत राहिले.
आता ते पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. त्याच बरोबर पक्षातील जे लोक त्यांच्या पक्ष विरोधी भूमिकेचे समर्थन करत आहे. त्यांचीही माहिती कळवणार आहे. वाकचौरे यांनी तात्काळ शिर्डी संस्थानचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांना या पदावरून काढणायसाठी विनंती करणार आहे. त्यामुळे पक्षात अनेक पात्र कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी मिळेल व अश्या प्रवृत्तींना चपराक बसेल, असेही उदमले म्हणाले.