नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधीचे पैसे म्हणजे त्यांची जीवनभराची कमाई असते. जोपर्यंत आपण नोकरी कराल तोपर्यंत आपण ईपीएफमध्ये योगदान देता आणि जेव्हा आपण सेवानिवृत्त होता तेव्हा आपल्याला ती रक्कम मिळते, जेणेकरुन आपण आपले वृद्धत्व या पैशावर घालवू शकाल. परंतु बर्याचदा असे घडते की माहितीच्या अभावामुळे किंवा काही चुकांमुळे पीएफ खाते बंद होते. पीएफ खाते बंद होण्याची अनेक कारणे आहेत. म्हणूनच हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की आपण अशी कोणतीही चूक करता कामा नये.
ईपीएफ खाते केव्हा बंद होते?
1. जर आपण यापूर्वी ज्या कंपनीत काम केले त्या कंपनीकडून आपण आपले पीएफ खाते नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले नाही आणि जुनी कंपनी बंद झाली असेल. या प्रकरणात, जर आपल्या पीएफ खात्यातून 36 महिन्यांपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नाहीत, म्हणजेच त्यामध्ये पैसे जोडले गेले नाहीत. अशा परिस्थितीत आपले पीएफ खाते बंद केले जाईल. ईपीएफओ अशी खाती ‘ Inoperative ‘ कॅटेगरीत ठेवते.
2 . एकदा खाते ‘ Inoperative ‘ झाल्यावर तुम्हाला व्यवहार करता येणार नाही, खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओमध्ये जावे लागेल व अर्ज द्यावा लागेल. ‘ Inoperative ‘ असूनही, खात्यात पडलेल्या पैशांवर आपल्याला व्याज मिळते, म्हणजे आपले पैसे बुडत नाहीत, ते आपल्याला परत मिळतात. यापूर्वी या खात्यावर कोणतेही व्याज नव्हते. मात्र, 2016 च्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आणि व्याज सुरू करण्यात आले. आपल्या पीएफ खात्यावर आपल्या वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळते.
3. नवीन नियमांनुसार कर्मचा-यांनी ईपीएफ शिल्लक परत घेण्यासाठी अर्ज न दिल्यास ईपीएफ खाते ‘इनऑपरेटिव्ह’ होते.
ए – सेवानिवृत्तीच्या 36 महिन्यांनंतरही सदस्याचे वय 55 वर्ष झाले की.
ब-सदस्य जेव्हा कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाला असेल.
सी- सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर.
डी-सदस्याने सेवानिवृत्तीचे सर्व पैसे काढले असतील तर.
4 . जर 7 वर्षांसाठी पीएफ खात्याचा हक्क सांगितला नसेल तर हा निधी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये ठेवला जाईल.
ईपीएफओने आपल्या एका परिपत्रकात म्हटले की, निष्क्रिय खात्यांशी संबंधित दावे निकाली काढण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की फसवणूकीशी संबंधित जोखीम कमी व्हावी आणि योग्य दावेदारांना क्लेम दिला जावा. दरम्यान, निष्क्रिय पीएफ खात्यांशी संबंधित दावे निकाली काढण्यासाठी त्या कर्मचार्याच्या मालकास तो हक्क प्रमाणित करणे आवश्यक आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांची कंपनी बंद आहे आणि हक्क प्रमाणित करणारे कोणी नाही, अशा कर्मचार्यांना केवायसीच्या कागदपत्रांच्या आधारे बँक अशा दाव्यांचे प्रमाणपत्र देईल.
कोणती कागदपत्रे आवश्यक
केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशनकार्ड, ईएसआय आयडी कार्ड ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे. याशिवाय सरकारने दिलेली आधारसारखी इतर कोणतीही ओळखपत्रदेखील यासाठी वापरता येईल. यानंतर, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी रकमेनुसार खात्यांमधून विड्रॉल किंवा ट्रान्सफर करण्यास मंजूर होतील. ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या मान्यतेनंतर पैसे काढले किंवा हस्तांतरित केले जातील. तसेच ही रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास खाते अधिकारी निधी हस्तांतरण किंवा पैसे काढण्यास मंजूर करू शकतात. जर ही रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर डीलिंग सहाय्यक हे मंजूर करण्यास सक्षम असतील.