जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महात्मा फुले यांचे मुळगाव खानवडी (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भाऊ खोमणे यांची बिनविरोध निवड झाली. मनीषा अरविंद होले यांनी सरपंच पदाचा नियोजित कार्यकाळ पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी खोमणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुंभारवळणच्या मंडलाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी पी बी कोरे यांनी हा बिनविरोध निवडीचा निर्णय दिला.
तलाठी एस यु मोकाशी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले. मावळत्या सरपंच मनीषा अरविंद होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, माजी सरपंच दिपाली होले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, संतोष डुबल, नितीन नितिन होले, सोमनाथ होले, दत्तात्रय होले, राजेद्र होले, काळूराम होले, पोपट झुरंगे, दिपाली होले, ग्रामसेवक आनिल जगताप, यांनी नवनिर्वाचित सरपंचांचे यावेळी अभिनंदन केले.
- पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्या असेच ५ फायदे
- किडनी डॅमेज आहे का ? फक्त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्ट करून समजू शकते
- कोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्या याचे ८ फायदे
- सकाळी लिंबूपाणी पिल्याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
- कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया
- ‘हे’ आहेत लिव्हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
- शुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी
- शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक