…म्हणून प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जीच्या मैत्रीत पडली होती फूट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या मैत्रीच्या चर्चा होत्या. चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाच्या वेळी दोघींची ओळख झाली होती. यानंतर दोघींची खास मैत्री झाली. परंतु नंतर त्यांच्यात फूट का पडली हे कोणालाच माहित नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार, प्रीती झिंटा कायम स्वत:ला आउटसाईडर्स मानत होती. परंतु जेव्हा तिची आणि राणीची चांगली मैत्री झाली तेव्हा तिची ओळख बॉलवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शनक करण जोहर आणि शाहरुख खानसोबत झाली.

रामी जेव्हा करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या रायसोबत एकत्र वर्ल्ड टूरला गेली होती. तेव्हा प्रीतीला वाटायचं की, राणी तिच्यापेक्षा ऐश्वर्याच्या जास्त जवळ आहे. असं सांगितलं जातं की, चलते चलते सिनेमाच्या वेळी शाहरुखनं ऐश्वर्याला कास्ट केलं होतं. परंतु नंतर काही कारणास्तव राणीला घेतलं गेलं. यानंतर ऐश्वर्या आणि राणीच्या नात्यात दरी आल्याच्या चर्चा रंगताना दिसल्या. इतकंच नाही तर कल हो ना हो या सिनेमासाठी जेव्हा करणनं प्रीतीला कास्ट केलं तेव्हा राणीलाही वाईट वाटलं. हेच कारण आहे की, हळूहळू दोघी एकमेकींपासून दूर जाऊ लागल्या.

यानंतर राणी एका मुलाखतीत बोलताना म्हणाली होती की, “बॉलिवूडमधील 2 अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी बनू शकत नाहीत. कारण जेव्हा सिनेमांची ऑफर येते तेव्हा तुम्ही एकमेकींच्या स्पर्धक होता.”