परीक्षा जवळ आली असता दहावी, बारावीच्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन 

ऐन परीक्षेच्या ताेंडावर दहावी, बारावीच्या दाेन विद्यार्थ्यांनी अात्महत्या केल्याची घटना जळगाव व अमरावतीत या ठिकाणी घडली आहे. जळगावमधील यश नितीन इंगळे (१५) व अमरावतीमधील तेजस विजय गवळी (१७) अशी मृतांची नावे अाहेत. दाेघांनीही अापापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दाेघांच्याही अात्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

यश जळगावच्या इंग्रजी शाळेत शिकत हाेता. त्याचे वडील खासगी कंपनीत काम करतात तर अाई घरीच शिकवणी घेते. त्याचा लहान भाऊ लोकेश हा सातवीत शिकताे. शुक्रवारी सायंकाळी यशच्या मागणीनुसार वडिलांनी त्याला अाइस्क्रीम व चाॅकलेट अाणून दिले. ते खाऊन यश अभ्यासाच्या खाेलीत निघून गेला. अर्ध्या तासानंतर अाई त्याच्या खाेलीत गेली असता यशने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, या घटनेचा यशचे वडील नितीन इंगळे यांना प्रचंड धक्का बसला. रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अमरावतीतील खंडेलवाल नगरमध्ये राहणाऱ्या तेजस गवळी यानेही शनिवारी दुपारी गळफास घेतला. या दोन्ही घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.