Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11111 नवे पॉझिटिव्ह तर 288 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे तब्बल 11 हजार 111 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 288 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 8837 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
11,111 new #COVID19 positive cases, 8,837 discharges and 288 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 5,95,865 including 1,58,395 active cases, 4,17,123 discharges and 20,037 deaths: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/xE0mKBetOy
— ANI (@ANI) August 16, 2020
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 5 लाख 95 हजार 865 वर जावून पोहचला आहे. त्यामध्ये 1 लाख 58 हजार 395 रूग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत तब्बल 4 लाख 17 हजार 123 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत तब्बल 20 हजार 37 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1053897 लोक हे होम क्वारंटाईन आहेत तर 38203 लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 70 टक्के आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.36 टक्के आहे. आतापर्यंत 3162740 जणांचे सॅम्पल घेण्यात आले असून त्यापैकी 595865 रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह (18.84 टक्के) आढळले आहेत. राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.