आश्‍चर्यकारक ! ‘या’ 5 महत्वाच्या कारणांमुळं पाकिस्तानी मुलींची भारतीय मुलांशी लग्‍न करण्याची तीव्र इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील एक राजकुमार असतो. तिचा साथीदार कसा असावा याविषयी तिच्या काही आवडी निवडी असतात. मात्र पाकिस्तानमधील मुली त्यांच्या देशातील मुलांऐवजी भारतातल्या मुलांशी लग्नासाठी उतावळ्या दिसून येत आहेत. जवळपास प्रत्येक पाकिस्तानी मुलीला भारतीय मुलाशी लग्न करण्याची इच्छा आहे. अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये हि माहिती समोर आली आहे. यामध्ये पाकिस्तानी मुलींना भारतीय मुलांशीच लग्न करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये याच्यामागील कारण देखील देण्यात आले आहे.

या पाच कारणांमुळे पाकिस्तानी मुली भारतीयांशी लग्न करू इच्छितात

१) याचे पहिले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानमधील सासूपेक्षा भारतीय सासू हि जास्त प्रेमळ असल्याने त्यांना भारतीय मुलांशी लग्न करायचे आहे. पाकिस्तानमधील सासवा आपल्या सुनांना पाय दाबून देणे, त्याचबरोबर सारखे टोमणे मारण्याचे काम करतात. त्यामुळे भारतीय मुलांशी लग्न करू इच्छितात.

२) यागील दुसरे कारण म्हणजे पतीचे पत्नीशी बरोबर न वागणे. पाकिस्तानमधील पुरुषांना तक्रार करणाऱ्या महिला आवडत नाहीत. त्याचबरोबर महिलेने कोणतीही तक्रार करू नये अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर सतत पतीकडे लक्ष देण्याची देखील मागणी असते.

३) तिसरे महत्वाचे कारण म्हणजे हुंड्याची परंपरा. भारतात देखील हुंड्याची परंपरा आहे मात्र पाकिस्तानमध्ये हि परंपरा मोठ्या प्रमाणावर असून हुंड्याच्या रूपात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात.

४) कुटुंब नियोजन हि देखील एक महत्वाची समस्या असून पाकिस्तानमध्ये समजा हुंडा कमी दिला तर महिलेला मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. त्याचबरोबर महिलेला केवळ मुलं जन्माला घालण्याची मशीन समजण्यात येते.

५) पाचवे आणि शेवटचे महत्वाचे कारण म्हणजे भविष्याचा विचार. पाकिस्तानी मुलींना भारतीय मुलांमधील हा गुण सर्वात जास्त आवडत असून ज्याप्रकारे भारतीय मुले आपले शिक्षण पूर्ण करून भविष्याचा विचार करतात तो गुण पाकिस्तानी मुलींना आवडत असल्याने देखील त्या भारतीय मुलांशी लग्न करू इच्छितात.

आरोग्यविषयक वृत्त