आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी ७२ विशेष रेल्वेगाड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पंढरपुर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, अमरावती, खामगाव, लातुर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
[amazon_link asins=’B00WJI8L1G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b54e1e0a-8447-11e8-98f2-bfeb8a8b9c09′]

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहचेल. तर दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपुर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील. पंढरपुर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपुर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डुवाडी स्थानकातून पंढरपुरकडे प्रस्थान करेल.

अमरावती ते पंढरपुर अनारक्षित गाडीच्या चार फेऱ्या  होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता अमरावती स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी ११.१५ वाजता पंढरपुर येथे पोहचेल. तर पंढरपुर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. शेगाव ते पंढरपुर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता शेगाव स्थानकातून पंढरपुर कडे रवाना होईल. तर पढरपुर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातुर ते पंढरपुर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान करेल. तर त्याचदिवशी दुपारी २ वाजता पंढरपुर स्थानकातून सुटेल.
[amazon_link asins=’B06VWZ9DQ5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’becde919-8447-11e8-a3cb-71f032ba4251′]

मिरज व पंढरपुर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमु सोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता तर पंढरपुर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डुवाडी दरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमु गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.