Budget 2021 : ‘मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा’, खासदार संजय सिंह यांची कविता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प संसदेत सादर केला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर आम आदमी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींची घोषणा होती, की देश नहीं बिकने दूंगा, मात्र, आता उद्योगपतीच्या प्रेमाखातर त्यांनी आपली घोषणा बदलली आहे. आता पंतप्रधान मोदींची घोषणा मैं देश नहीं बचने दूंगा, अशी झाल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

खासदार सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओत म्हटले आहे, पंतप्रधान मोदी एकदा म्हणाले होते की, ‘ये देश नहीं बिकने दूंगा. मैं देश नहीं मिटने दूंगा, मात्र, काल सादर झालेला अर्थसंकल्प पाहिल्यानंतर चार ओळी सूचतात. पंतप्रधानांची घोषणा बदली आहे. ‘ये देश नहीं बचने दूंगा…ये खेत-खलिहान नहीं बचने दूंगा, किसान नहीं बचने दूंगा, नौजवान नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा…ये देश नहीं बचने दूंगा, व्यापार नहीं बचने दूंगा, कर्मचारी नहीं बचने दूंगा, बैंक नहीं बचने दूंगा…LIC नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा… ये देश नहीं बचने दूंगा, ये सेल नहीं बचने दूंगा… ये रेल नहीं बचने दूंगा, BPCL नहीं बचने दूंगा, एयरपोर्ट नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा…ये देश नहीं बचने दूंगा, अशी कविता सादर केली आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्प केवळ चार भांडवलदारांना फायदा करून देण्यासाठी आणि संपूर्ण देश त्यांनाच विकण्यासाठी तयार केला आहे. देशाच्या जनतेला समजले आहे, की मोदी देशाचे नाही तर केवळ चार भांडवलदार मित्रांचेच पंतप्रधान आहेत. त्यांच्याच हातात देशाची संपत्ती गहाण ठेऊन सर्व काही विकण्याचा विचार आहे. एक सपूत असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक कपूत असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो, असे म्हणत खासदार सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.