लग्न झाल्यानंतर सासरी जात होती नववधू, अपघात झाला अन् सर्वकाही संपलं…

बिजनौर : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे नजीबाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आणि कारमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. यातील दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये तीन दिवसांच्या नववधूचा मृत्यू झाला. तसेच कारमध्ये असलेल्या वरही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बढापूर येथे राहणाऱ्या पूजाचा विवाह 16 फेब्रुवारीला किरतपूर येथील मोचीपुरा येथे झाला. शुक्रवारी लग्नसोहळा आटोपल्यानंतर पूजा सासरी जाण्यासाठी कारने जात होती. पण नजीबाबाद येथील रायपूर रोडजवळ एका अज्ञात ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये नववधू पूजा जागीच ठार झाली. तर कारमध्ये बसलेला वर आणि त्याच्या कुटुंबातील 6 जण जखमी झाले. वधू जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. पण ते गंभीर जखमी झाल्याचे पाहता त्यांना हाय सेंटर जाण्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिसांना या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आत्तापर्यंत ट्रॅक्टर ट्रॉलीचा शोध लागला नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

स्पीड ब्रेकर नसल्याने दुर्घटना

या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने शेकडो वाहने भरधाव वेगात जातात. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने दुर्घटना होत असते. लोकांच्या मोठ्या विरोधानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचे आश्वासन दिले आहे.