Amitabh Bachchan | माधुरीच्या उद्दामपणावर अमिताभने शिकवला तिला चांगलाच धडा; पुन्हा कधीच ही जोडी दिसली नाही एकत्र

पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan | बॉलीवुडमधील बीग बी अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक पिढ्यांना आपल्या चित्रपटांमधून मनोरंजन केले आहे. त्याचप्रमाणे धक धक गर्ल म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित (Actress Madhuri Dixit) हिने देखील दोन दशके बॉलीवुडवर राज्य केले आहे. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांनी आपल्या अभिनयातून व गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र या दोघांना एकत्र काम करण्याचा योग काही आला नाही. आणि एकदा आला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी माधुरीला चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर ही जोडी पुन्हा कधीच पडद्यावर एकत्र काम करताना दिसली नाही.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटातील ‘मेरे प्यार का रस जरा चखना, ओये मखना’ या गाण्यावर अमिताभ-माधुरी एकत्र नाचताना दिसले. यानंतर ही जोडी पुन्हा कधीच दिसली नाही. 90 च्या दशकात माधुरी टॉपवर असलेली हिरोईन होती. तिची प्रसिद्धी फार वाढली होती. या काळात तिच्या आणि अभिनेता अनिल कपूरच्या (Actor Anil Kapoor) जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये बेटा (Beta), तेजाब (Tejab), हिफाजत (Hifajat), परिंदा (Parinda) यांसारखे काही उत्कृष्ट चित्रपट सुपरहिट केले होते. या चित्रपटांमुळे माधुरी सुपरस्टार झाली होती.

दरम्यान माधुरी आणि अनिल कपूर (Madhuri and Anil Kapoor) त्यांच्यातील जवळीक वाढत चालली होती. त्या दोघांची चर्चा सर्वत्र होती. चित्रपटांबरोबरच दोघे वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांचे निर्णय घेत होते. तेव्हाच्या रिपोर्ट्सनुसार, अनिल माधुरीबद्दल खूप पझेसिव्ह झाले होते, अशात माधुरीने इतर कोणत्याही स्टारसोबत काम करावे असे त्यांना वाटत नव्हते. विशेषतः तिने अमिताभ यांच्यासोबत चित्रपटात काम करु नये असे अनिल यांना वाटत होतं.

माधुरीनेही अनिल यांच्या सुरात सुर मिसळत त्यांच्या या मागणीला होकार दिला मात्र अचानक जेव्हा अनिल यांचेच चित्रपट फ्लॉप होऊ लागले तेव्हा माधुरीने अनिलपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आणि ती आता अमिताभसोबत चित्रपटात काम करण्याच्या संधीच्या शोधात होती. माधुरीलाही पहिली संधी 1988 मध्ये दिग्दर्शक टिनू आनंद (Director Tinu Anand) यांनी दिली होती. मात्र तरी हे सूत काही जुळू शकले नाही.

टीनू आनंद यांनी माधुरी आणि अमिताभ यांना घेत एक बिग बजेट चित्रपट काढला. पण माधुरीच्या उद्दामपणामुळे
या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यत्यय येत होता व चित्रपट लांबणीवर पडला.
असे म्हटले जाते की टिन्नू यांनी माधुरीला अमिताभसोबत त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर दिली आणि
दोघांनीही आनंदाने हा चित्रपट करण्यास होकार दिला. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनंतर
माधुरीला तिच्या भूमिकेबाबत कमीपणा वाटू लागला. अमिताभपेक्षा आपली भूमिका कमकुवत आहे,
अशी तक्रार करण्यास सुरुवात केली. टिनू यांनी तिला अमिताभ यांच्या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका काय आहे
हे सांगितले असतानाच तिने दिग्दर्शकावर स्क्रिप्ट बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

अमिताभ यांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी दिग्दर्शकांना चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यास सांगितले.
दिग्दर्शक टिनू आनंद यांनी या चित्रपटाला खूप पैसा लावला होता त्यामुळे त्यांना सिनेमाचं चित्रीकरण
(Movie Shooting) थांबवायचं नव्हतं. अशा परिस्थितीत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
यांनी टिनू यांचा हा चित्रपट विकत घेतला आणि चित्रपट कायमचा बंद केला.
हा पहिला आणि शेवटचा क्षण होता जेव्हा अमिताभ यांनी माधुरीसोबत (Amitabh And Madhuri) कधीही काम
न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच या दोघांनी पुन्हा कधीच कोणता चित्रपटात एकत्र काम केले नाही.

Web Title : Amitabh Bachchan | bollywood madhuri dixit and amitabh bachchan have never work together know the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन मनसेने काढला चिमटा; म्हणाले – ‘ही मंडळी पुन्हा…’

Maharashtra Politics News | वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

Hruta Durgule | अभिनेत्री ऋता दुर्गुळे पडली होती सहकलाकाराच्या प्रेमात; मुलाखतीमध्ये केले कबुल