Amol Kolhe On Onion Export | डीजीएफटीने कांदा निर्यातबंदी उठवल्याच नोटिफिकेशन काढलेच नाही – डॉ. अमोल कोल्हे
महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, डॉ. अमोल कोल्हेंचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल
जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Onion Export | डीजीएफटीने कांदा निर्यातबंदी उठवलायचे कोणतेही नोटीफिकेशन काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असं थेट सवाल डॉ, अमोल कोल्हे यांनी केलाय.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या
दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी बद्दल केलेल्या गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच भल केलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्यावर, त्यामुळं घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट ट्विट करावं लागतं असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या उमेदवारांनी याच उत्तर द्याव, महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असं थेट सवाल डॉ, अमोल कोल्हे यांनी केलाय.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल