…तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार : अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू- काश्मीर) :

जर केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे कलम ३५ (अ )आणि ३७० संदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही लोकसभा, विधानसभा पंचायतींच्या निवडणुकांवरही बहिष्कार घालू, असा इशारा जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी दिला आहे. श्रीनगर येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० आणि ३५ (अ ) बाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अन्यथा आमची पार्टी पंचायत समितीसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकेन, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. पीडीपीनेही अब्दुल्ला यांच्या सुरात सूर मिसळून केंद्र सरकारने पंचायत समितीच्या निवडणुका आणि अनुच्छेद ३५ (अ ) बाबत भूमिका स्पष्ट करावी. तरच आम्ही निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ, असं म्हटलं आहे. दरम्यान, जम्मू- काश्मीरला विशेष अधिकार देणाऱ्या कलम ३५ (अ) च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी १९ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.

कलम ३५ (अ)
जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या कलम ३५ (अ ) हा मुद्दा संवेदनशील आहे. कलम ३५ (अ ) नुसार जम्मू आणि काश्मीरचा कायमचा निवासी नसलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला स्थावर मालमत्ता विकत घेता येत नाही, त्याचबरोबर कायमचा निवारा सुद्धा मिळू शकत नाही, सरकारी नोकऱ्या सुद्धा मिळवता येऊ शकत नाहीत.

कलम ३७०
या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देताना काही तरतुदी केल्या होत्या. राज्यात कोणताही कायदा लागू करण्याआधी केंद्र सरकारला राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व तसेच राज्याच्या घटनेला बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. राज्यात आणीबाणी लागू करता येत नाही, अशी तरतुदी आहेत.

जाहिरात

अमिताभ बच्चन यांची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत

जाहिरात

[amazon_link asins=’B0756RF9KY,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8987ca26-b360-11e8-ad83-8947c470ca22′]