राजस्थान : भाजपाच्या आमदाराचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘राहुल, सोनिया, प्रियंका हे देशाचे दुश्मन’
जयपुर : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) विरोध केवळ सामान्य नागरिकच नाही तर विरोधी पक्षांनीही केला आहे. हे घटनेचे उल्लंघन असल्याचे बहुतेक विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. खासकरुन या संदर्भात काॅंग्रेसने सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. राजस्थानातील रामगंज मंडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. आमदार मदन दिलावर यांनी त्यांना देशाचे शत्रू म्हटले आहे.
Rajasthan BJP MLA, Madan Dilaawar: They do not have the right to live in this country. If they love Pakistan they should go there, if they love Bangladesh they should go there, and if both the countries don't want them, they can drown in the Indian ocean. (30.12.19) https://t.co/9vvdWKQZ1j
— ANI (@ANI) December 31, 2019
मदन दिलावर म्हणाले की, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला घेऊन जे लोक देशाला जाळत आहे, पोलिसांची हत्या करत आहे, त्याचबरोबर त्यांचे समर्थन करत आहे ते देशाचे शत्रू आहेत.’ मग ते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा असो.
भाजप आमदार म्हणाले की, त्यांना देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना पाकिस्तान हवा असेल तर त्यांनी तिथे जावे. जर त्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तिथे जावे. जर दोन्ही देशांना ते नको असतील तर ते हिंद महासागरात बुडू शकतात.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- किवी फळाचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यायी फायदे, जाणून घ्या
- ‘या’ ४ रक्तगटानुसार ठरवा कोणता चहा प्यायचा ! जाणून घ्या
- ‘चिकन सूप’ प्या, मानसिक ताण दूर पळवा ! ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा
- दही-भात खाण्याचे ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- जेवण स्वादिष्ट बनवणारा ‘तेजपत्ता’ या ७ समस्यांवर आहे गुणकारी
- ‘या’ ५ गोष्टी कमी करतील तुमचे ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या
- रात्री केस धुवून झोपत असाल तर ‘या’ ७ गोष्टींचा आहे धोका !