#MeToo वर महिला दोन-चार लाख घेऊन लावतात लैंगिक अत्याचाराचे आरोप: भाजप खासदार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

सध्या #MeToo अभियानाने मोठा जोर पकडला आहे . केवळ बॉलिवूड मधील नाही तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रकरणे यामुळे उघडकीस येत आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून कथित स्वरूपात लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या महिलांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्या पुरुषांची नावे सार्वजनिक केल्यामुळे सोशल मीडियावरही धुमाकूळ माजला आहे. याच दरम्यान केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनीही महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. परंतु भाजपाचे खासदार उदित राज यांनी या प्रकरणावर बोजरी टिप्पणी केली आहे.

काय आहे उदित राज यांचे ट्विट

ट्विट करत ते म्हणाले, #MeToo अभियान गरजेचं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षांनंतर लैंगिक शोषणाचा आरोप लावलं कितपत योग्य आहे ?, इतक्या वर्षांनंतर या प्रकरणांची सत्यता कशी पडताळली जाणार आहे. ज्या व्यक्तीवर असे लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात येतात, त्यांची प्रतिमा मलिन होऊन त्यांना किती नुकसान होत असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. #MeTooच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडला जातोय.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dabf0129-cbc0-11e8-a666-f55852aeb018′]

उत्तर पश्चिम दिल्लीतून खासदार असलेले उदित राज यांनी #MeToo अभियानावर टीका केली आहे. या अभियानाचा उपयोग इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातोय. हे कसं शक्य आहे की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलगी स्वतःच्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करेल आणि त्याच्यावर खटला दाखल होईल. अशा प्रकारची घटना गेल्या काही दिवसांपासून कोणा ना कोणाबरोबर तर घडतेच आहे. याचा ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातोय काय?, असं उदित राज म्हणाले आहेत.

[amazon_link asins=’B07BR3KDDP,B078T6WPDQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea6866f5-cbc0-11e8-95bb-a73b3ef6b598′]

महिला खरं तर एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचे आरोप लावण्यासाठी दोन – चार लाख रुपये घेतात. त्यानंतर तेच आरोप लावण्यासाठी दुस-या व्यक्तीची निवड करतात. ही मनुष्याची प्रकृती असल्याचं मला स्वीकार आहे. परंतु महिलाही सभ्य आहेत काय?, त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकत नाही काय?, परंतु महिलांच्या अशा प्रकारच्या वर्तनानं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, असंही उदित वृत्तसंस्थेला माहिती देताना राज म्हणाले आहेत.

आता उदित यांच्या अशा प्रकारच्या ट्विट नंतर मात्र खळबळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.