…म्हणून धनंजय मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले
पाचपुतेंची माफी न मागितल्यास श्रीगोंद्यात पाय ठेवू देणार नाही ; कार्यकर्ते आक्रमक
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले ? मुंडे यांनी पाचपुते यांची माफी मागावी अन्यथा त्यांना श्रीगोंद्यात पाय ठेवू देणार नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून अपयश आले म्हणून धनंजय मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा आरोप श्रीगोंदा येथील भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
शिवस्वराज्य यात्रेत मुंडे यांनी पाचपुते यांचा उल्लेख ‘बबन्या’ केला होता. त्याचा आज निषेध करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देत मुंडे यांच्या विधानाचा निषेध केला. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकीय दिशा मिळाली. मुंडे यांना त्रास देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमचे राजकिय दैवत बबनराव पाचपुते सहा वेळा आमदार झाले, तीन वेळा मंत्रीपद तर तीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यामुळे पाचपुतेंवर धनंजय मुंडे यांनी केलेली टिका म्हणजे ‘बुडतीचे पाय डोहाकडे’ असा प्रकार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सभापती शहाजी हिरवे, भाऊसाहेब गोरे, संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, बापुसाहेब गोरे, प्रतिभा झिटे, दत्तात्रय कोठारे, आबा दांगडे आदींच्या सह्या आहेत.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा