राम मंदिराच्या उभारणीची वाट पाहणाऱ्या लोकांचा संयम आता संपत आला आहे. राम मंदिरासाठी आता सरकारनं कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राम मंदिर बांधण्यास सुरुवात करतील.असं घडल्यास देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा सूचक इशारा रामदेव बाबांनी सरकारला दिला. सध्या देशात कोणीच भगवान रामाच्या विरोधात नाही. देशातील सर्व हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव त्यांचेच वंशज आहेत, असंही ते पुढे म्हणाले.
राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता संसदेतून
राम मंदिर न उभारल्यास देशातील परिस्थिती बिघडेल, असा इशारा आधीदेखील रामदेव बाबांनी दिला होता. ‘राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता सर्वोच्च न्यायालयातून नव्हे, तर संसदेतून जातो. त्यामुळे सरकारनं यासाठी पुढाकार घ्यायला हवा. लोकांचा संयम संपत आला आहे. आता ते फार काळ मंदिरासाठी वाट पाहू शकत नाहीत,’ असं रामदेव बाबांनी मुझफ्फरनगरमध्ये म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्त आणि रामभक्त असल्याचंदेखील ते म्हणाले होते.