‘या’ राज्यात 1 ली ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द !

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   शालेय विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगाल (West bangal) सरकारनंतर आता मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारनेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता (No Exam) थेट पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रोजेक्टच्या आधारावर केले जाईल. याशिवाय यावर्षी 5 वी व 8 वीच्या बोर्डाच्या परीक्षादेखील होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेश सरकारने यापूर्वीच 1 ली ते 8 वीपर्यंतचे वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता शालेय शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) इंद्रसिंह परमार यांनी राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. यावर्षी 5 वी व 8 वी बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, तर दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच वर्ग सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. इयत्ता 9 आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाळेत बोलावले जाऊ शकते.

ADV

राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
महाराष्ट्रातील शैक्षणिक (Maharashtra Education) संस्थेतील काही जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक (Students and Teachers) संक्रमित (Covid-19) झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी (दि. 9) दिली आहे.