कार विहिरीत कोसळून 4 जणांना जलसमाधी ?

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – जालन्याहून देवळगावराजाकडे निघालेली कार जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळून चार ते पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अंधारामुळे मदत कार्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा अपघात कसा झाला हे समजू शकले नाही.

मदत कार्य करण्यासाठी घटनास्थळी क्रेन मागविण्यात आली आहे. विहीर तुडुंब भरलेली असल्यामुळे विहिरीतून कार बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारमध्ये प्रत्यक्ष किती लोक आहेत हे समजू शकलेलं नाही. रात्री एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून संबंधित व्यक्ती बीड येथील असल्याचे समजते. घटनास्थळी पोलिस उपधीक्षक सुधीर खिरडकर, जालना तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बागुल यांच्यासह कर्मचारी मदतकार्य करत आहेत.