Chitra Wagh On Supriya Sule | ‘राज्याच्या मोठ्ठ्या ताई’ म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडेबोल

पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh On Supriya Sul | नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांचा आणि बालकांचा मृत्यू झाला आहे (Deaths In Govt Hospitals In Maharashtra). या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नांदेडमधील रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली आणि तेथील मृताच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना मी आरोग्यमंत्री असते तर नांदेडमध्ये आठवडाभर राहयला आले असते आणि राजीनामा मागितला असता तर तो देखील दिला असता अशी प्रतिक्रिया दिली होती. आता भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खा. सुप्रिया सुळे यांना खडेबोल सुनावले आहेत. (Chitra Wagh On Supriya Sule)

https://x.com/ChitraKWagh/status/1710232957712232709?s=20

भाजपाकडून चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “राज्याच्या “मोठ्ठ्या ताई” 2 दिवसांपासून राज्य सरकारवर टीवटीव करतांना दिसताहेत.. कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला… झालेली घटना दुर्दैवी आणि वाईटचं यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाहीच याबाबत आपण निश्चिंत रहा. राज्यातील प्रत्येकाचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आणि राज्यसरकार मजबुतीने ठामपणे पिडीत परिवारांच्या सोबत उभं आहे. शिवाय पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी ही उपाययोजना केली जाईल.” असे चित्रा वाघ यांनी लिहिले आहे. (Chitra Wagh On Supriya Sule)

पुढे त्यांनी मविआ सरकारच्या काळामध्ये झालेल्या अग्नीकांडाचा उल्लेख केला. चित्रा वाघ यांनी लिहिले आहे की, “मविआ काळात घडलेलं भंडारा अग्नीकांड विसरलात का हो तुम्ही ताई ??? 11 नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला ??? त्या तुमच्या मविआ काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अग्नीकांड झाले ज्यात कित्येक माणसं दगावलीत. तरीही त्यावेळच्या तुमच्या पक्षाच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई ??? तिथं ना स्मोक डिटेक्टर बसवले होते, ना अग्निरोधक यंत्रणा. तेव्हा तोंडदेखली मलमपट्टी म्हणून तुम्ही राज्यातल्या सगळ्याचं हॉस्पिटलचे ऑडीट करण्याचे आदेश दिले. पण, तुमच्या इतर आश्वासनांसारखं ऑडिटही हवेतच विरून गेलं. टीका करणं हा तुमचा अधिकार आहे पण आताचं महाराष्ट्रातील महायुतीच सरकार action mode मधलं सरकार आहे ताई. ते तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही.”

“नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द
मुख्यमंत्र्यांनी दिलाय ताई…आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन उपाययोजनाही केल्या जाताहेत पण,
तरीही तुमचे राज्य सरकारवर बेछूट आरोप सुरूच आहेत…कारण, कोमात गेलेल्या तुमच्या राजकारणाला जिवंत
ठेवण्यासाठी या घटनेतूनच सलाईन मिळतंय…खरयं ना. कोरोना काळात ऑक्सिजन आणि औषधांअभावी रूग्ण
तडफडत असताना तुम्ही मात्र नाकर्त्यासारखे सत्तेच्या गादीला जळवांसारखे चिकटून होतात.
आणि, तत्कालीन मुख्यमंत्री पालीसारखे मातोश्रीच्या भिंतींना चिकटून होते. ते घराबाहेर पडलेच नाहीत कधी.
राज्याची आरोग्य यंत्रणा कार्यक्षम बनवण्याचा तुमचा राजकारणी वादा हवेतचं विरला. राजकारण आपल्या जागी आहे,
पण तुमचा कळवळा तरी खरा असू द्या. ‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती..’ हे तुकोबांचं वचन लक्षात
ठेवा आणि मग राजकारण करा….मोठ्ठ्या ताई”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrikant Shinde On Aaditya Thackeray | जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले