नवरदेवासह रात्रभर वऱ्हाड फिरलं गावभर पण तरीही नाही सापडलं नवरीचा घर

पोलीसनामा ऑनलाईन टीम  वाराणसी: लग्न म्हंटल की घाईगडबड, गोंधळ असतोच. काही वेळा हुंड्यासाठी तर कधी पाणपानांमुळे लग्न मोडतात. मात्र नवरीचे घर न सापडल्याने लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशमधील आजमगढमध्ये घडली आहे. विशेष संपूर्ण रात्रभर वऱ्हाड नवरीचे घर शोधात होते नवरीचं घर सापडलं नाही वा तिच्या कुटुंबाची कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे मजबुरीनं संपूर्ण वऱ्हाडाला निराश होऊन माघारी परतावं लागलं.यामुळे लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला मोठा धक्का बसला.

आजमगढमध्ये राहणाऱ्या एका युवकाचं लग्न १० डिसेंबर रोजी मऊ जिल्ह्यातील एका युवतीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या रात्री नवरदेव संपूर्ण वऱ्हाड घेऊन मऊ जिल्ह्यातील होणाऱ्या नवरीच्या गावात गेला, परंतु नवरीचे घर सापडले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नवरदेवाकडील मंडळींनी लग्नात मध्यस्थी करणाऱ्या महिलेला शनिवारी रात्री पकडून बंधक बनवलं, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारामुळे खळबळ माजली. महिलेचा दावा आहे की, नवरीच्या कुटुंबाने तिचीही फसवणूक केली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी शमशेर यादव म्हणाले की, नवरदेवाच्या कुटुंबाने लग्न ठरवणाऱ्या महिलेच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही दोघांनाही समस्या सोडवण्याची संधी दिली, शनिवारी रात्री दोघांमध्ये समझौता झाला आणि नवरदेवाच्या कुटुंबाने महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

नवरदेवाचे कुटुंब छतवारा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आलं, या महिलेने मुलाचं लग्न ठरवण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर मऊ जिल्ह्यातील मुलीचं स्थळ पाहण्यात आलं, दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार झालं, लग्नाची तारीख ठरली, मुलाच्या कुटुंबाने मुलीकडील मंडळींना बँडबाजा आणि अन्य कार्यासाठी २० हजार रुपये दिले होते. मात्र लग्नाआधी मुलाचं कुटुंब मुलीच्या घरी न गेल्याने सगळा गोंधळ उडाला.