संविधान जाळणाऱ्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- संभाजी ब्रिगेड 

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

दिल्लीमधील जंतरमंतर येथे भारतीय संविधान जाळणाऱ्या लोकांचे भारतीयत्व रद्द करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संविधान जगण्याची भाषा शिकवते. लोकशाही’चे सर्वोच्च तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. समता, समानता, बंधुता व सार्वभौमत्वता टिकविण्यासाठी संविधान गरजेचे आहे.
[amazon_link asins=’B07CKDTBSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3b372dd-9fbe-11e8-b9f4-ad3244af7719′]

परंतु दिल्ली येथे देशद्रोही लोकांनी भारताचे संविधान जाळले. हि घटना अत्यंत गंभीर असून  देशद्रोही आहे. म्हणून भारतीय राज्यघटना जाळणाऱ्या संजय शर्मा, अनूप दुबे, कृष्णमोहन राय, रोहित गुप्ता आशुतोष झा, संतोष शुक्ल, प्रवेश साहनी, कामिनी झा, श्रीनिवास पांडे यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे. यांचे कृत्य देशद्रोही प्रकारचे असून या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

देशद्रोह्यांनी ९ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली, जंतर मंतर येथे संविधान च्या प्रत जाळली या घटनेचा तीव्र निषेध…!

भारतीय संविधान जाळताना… संविधान मुर्दाबाद, आंबेडकर मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद, मनुस्मृती जिंदाबाद, संविधान जलावो… देश बचावो अशा घोषणा दिलेल्या आहेत. हे अत्यंत भयानक आहे. म्हणजे संविधान जाळणारे… हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. आणि संविधान विरोधी सुद्धा आहेत. संविधानाला विरोध करणे म्हणजे देशांच्या ऐकात्मतेला विरोध करणे, या देशातील नागरिकांना घटनेने दिलेल्या हक्क अधिकारांना विरोध करणे असा होतो. परंतु आपण… संविधान समर्थक असून संविधानाचा जागर केला पाहिजे… ते संभाजी ब्रिगेड सक्षमपणे करेल… कारण ‘संविधानाचे पहिले पान… हेच संभाजी ब्रिगेड चे तत्त्वज्ञान आहे.’ असे मत संभाजीब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले.

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, चंद्रशेखर घाडगे, सिध्दार्थ कोंढाळकर, पप्पु पांडव, सुरेखा जुजगर, महादेव मातेरे, संजय चव्हाण, संतोष भंडारी, जयदिप रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.