Corona Vaccination : लसीकरणानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतोय का? ICMR नं मागवली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर दिला जात असून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत 19 कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अशातच कोरोना विरोधातील लस किती प्रभावी आहे? याच्या तपासासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) माहिती गोळा केली जात आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिका्ंना हॉस्पिटलमध्य्ये दाखल करावे लागले याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

लसीकरणानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण अॅक्टिव्ह आहेत? तसंच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि करोना संसर्ग रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असण्याचा कालाविधीसंबंधी माहिती ICMR ने मागितली आहे. कॉमन पोर्टल डेटा अपलोड करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून कोरोनाविरोधी लस खरच किती प्रभावी आहे? हे समजण्यात मदत होईल. लस घेतल्यानंतरही माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यास मदत होणार असल्याचे आयसीएमआरचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले. दरम्यान देशात 16 जानेवारीपासून ते आतपार्यंत 14.49 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी 15.19 टक्के नागरिकांना पहिला डोस दिला आहे. कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या4.30 कोटी आहे.