‘या’ अभिनेत्रीमुळे करण जोहर राहिला अविवाहित !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड निर्माता करण जोहरने दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. या चित्रपटासाठी करण जोहरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनं जिंकली. राज कपूर, यश चोप्रा, सुरज बडजात्या यांच्या कामाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता. त्यामुळेच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे ‘दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे’ या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत केले.

धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण हा मुलगा आहे. त्याने आज एक प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक अशी आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील निर्माता करण जोहर आज आपला ४९वा वाढदिवस साजरा करतो आहे. वाढददिवसानिमित्त जाणून घेऊया करणच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी. करण जोहरचे एकेकाळी एका अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम होते आणि त्यानेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये कबूल देखील केली होती. करण आणि ट्विंकल खन्ना एकाच शाळेत शिकत होते. लहानपणापासूनच त्यांची खूप चांगली मैत्री होती. ‘कुछ कुछ होता है’ या करणच्या पहिल्या चित्रपटात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी असे करणला वाटत होते. पण ट्विंकलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे ‘टीना’ या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या चित्रपटातील नायिकेचे नाव ‘टीना’ ठेवले होते. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट अक्षय कुमारला देखील माहीत असून यावरून त्याने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करणची टर देखील उडवली होती.