महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – 151 तालुक्यात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर  करण्यात आला आहे. धक्कादायक बाब अशी की, 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. इतकेच नाही तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने ऐन वेळेस दडी मारल्याने  राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती बनली होती.
गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112)
सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव
सातारा (1) : माण-दहीवडी
सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड
धुळे (2) : धुळे, सिंदखेडे
जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा
नाशिक (4) :  बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर
अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड
बीड (11) :  आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,
जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर
नांदेड (2) : मुखेड, देगलूर
उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
हिंगोली (2) :  हिंगोली, सेनगाव
अमरावती (1) : मोर्शी
बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
यवतमाळ (6) :  बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
चंद्रपूर (1) : चिमूर
नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर
मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39)
पुणे (7) – आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी
सातारा (2) – कोरेगांव, फलटण
धुळे (1) – शिरपूर
नंदुरबार (1) – तळोदे
नाशिक (4) – देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
नांदेड (1) – उमरी
हिंगोली (1) – कळमनुरी
लातूर (1) – शिरुर अनंतपाळ
अकोला (5) – बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
अमरावती (4) – अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी
बुलडाणा (1) – मोताळा
वाशिम (1) – रिसोड
यवतमाळ (3) – केलापूर, मारेगांव, यवतमाळ
चंद्रपूर (4) – ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही
नागपूर (1) – नरखेड
वर्धा (2) – आष्टी, कारंजा
राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यावेळी दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य तालुक्यांबाबतही माहिती दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.

दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 31 ऑक्टोबर (आज) पासून अंमलात येत आहेत. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.