ईडीच्या कारवाईची भीती असल्याने सुजयला भाजपात पाठवले ? – शिवसेना नेत्या मनिषा कायंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्यामागील ईडीची पीडा टळावी म्हणूनच राधाकृष्ण विखें पाटील यांनी सुजयला भाजपमध्ये पाठविले का ? असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. सुजय विखे यांनी कालच भाजपचे मंत्री  गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्याशी ते चर्चा करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मनिया कायंदे यांनी हा उपहासात्मक प्रश्न विचारला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असले तर ते शासनाचे दूत म्हणूनच जास्त वावरत होते. गेली काही वर्षे याचा अनुभव आला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय कॉंग्रेसमध्ये तर एक पाय भाजपात अशी अवस्था आहे. आपल्यावर ईडीची कारवाई होईल याची भीती त्यांना वाटते. असे कायंदे म्हणाल्या.

सुजय विखे यांनी वैद्यकिय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी गिरीश महाजनांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. त्यानुसार दोघे भेटले होते असा खुलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.