नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं, अन्…; प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खुलासा

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन
#MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता  हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप केला होता त्यानंतर बॉलिवूड मध्ये #MeToo चे वादळ उठले. त्यानंतर आता ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि राडा सुरू झाला. तनुश्री नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरांना नानांची तक्रार करत मोठमोठ्या आवाजात बोलत होती. ती घाबरलेली होती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जे घडले धक्कादायक होते, असे त्या दिवशी सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. त्या दिवशी ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर असताना काय घडले हे कोणीही सांगण्यास तयार नव्हते. रामदास बोर्डे या स्पॉटबॉयने घडलेला प्रकार कथन केला.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c071fd1-cec2-11e8-beae-0d83ab265b9e’]
त्या दिवशी सेटवर नेमके काय घडले?
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. गणेश आचार्य आणि चित्रपटाच्या काही मोठ्या लोकांशी इंग्लिशमधून भांडू लागली. सुरुवातीला सगळ्यांना काय चाललंय तेच कळत नव्हतं. नानानं काहीतरी केलंय, असा तिचा रोख स्पष्ट दिसत होता. सगळे जण तिची समजूत घालत होते. नाना मोठा माणूस आहे. तुझे करिअर बरबाद होईल असेच सगळे तिला सांगत होते. पण तनुश्री ऐकायला तयार नव्हती. ती आपली बाजू तावाने मांडत होती. तिच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत होते. काही वेळातच ती तेथून निघून गेली. थोड्या वेळाने नाना पाटेकर बाहेर आले आणि जणू काही घडलेच नाही असे ते वावरू लागले. पण इतर सारेच नानांकडे संशयाने बघत होते. शूटिंग बघणा-या आणि स्पॉटबॉयला नानांचा राग आला होता. त्यांना पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या अनेकांचे म्हणणे होते, पण पुढे कोणीही आले नाही. प्रत्येक स्पॉटबॉयला आपल्या रोजगाराची चिंता होती. त्यात मीही होतो. त्यामुळे नानांना काहीच झाले नाही.
[amazon_link asins=’B00KGZZ824,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6157c788-cec2-11e8-95db-8125b8816d66′]
राखी सावंत खोटे बोलतेय!
त्या दिवशी तनुश्री अंमलीपदार्थांच्या नशेत होती आणि गणेश आचार्य यांचा फोन आल्यानंतर मी लगेच सेटवर पोहोचले, असे अभिनेत्री राखी सावंतचे म्हणणे तद्दन खोटे आहे. तनुश्रीने ड्रग्ज घेतलेले असते तर गाण्याचे काही टेक ती देऊच शकली नसती. शिवाय राखी स्वत: सेटवरही पोहोचली नव्हती. कारण त्यानंतर दोन दिवस शूटिंगही झाले नव्हते.
मी कोर्टात साक्ष द्यायला तयार
या प्रकरणात मी कोर्टात साक्ष द्यायला तयार असल्याचे रामदास बोर्डे यांनी सांगितले. ते म्हणाले, तनुश्रीच्या बाबतीत जे घडले ते अनेक नवख्या अभिनेत्रींबाबत घडत आले आहे. त्या साऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मी समोर आलोय. मला माझ्या जिवाची आणि रोजगाराची पर्वा नाही. फक्त सत्य समोर यायला हवे, हाच माझा उद्देश आहे.
[amazon_link asins=’B07437YHXP,B07GFBC27M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a51fc591-cec2-11e8-af8a-c571cd584647′]