परिवारवाद देशाचे भले करू शकत नाही : अमित शहा 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन

परिवारवाद देशाचे भले करू शकत नाही.अशी परिकल्पना ही चाणक्यांनी दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी मांडली असल्याची सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘आर्य चाणक्य-जीवन और कार्य : आज के संदर्भ में’ या विषयावर व्याख्यान देताना गांधी परिवारावर निशाणा देखील साधत भारतीय जनता पार्टीचा परिवारवादला  विरोध असल्याची भूमिका देखील त्यांनी मांडली.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने बाराव्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानामध्ये ‘आर्य चाणक्य-जीवन और कार्य : आज के संदर्भ में’ या विषयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित शहा म्हणाले की, राजाचा एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती.अशा शब्दात नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, राजा संविधानाचा प्रथमसेवक आहे. सात विभागात राज्याची विभागणी केली.आजही जगभरात हेच विभाग अस्तित्वात आहे. शासन कर वसूल करण्याचे तंत्र फुलातून मध गोळा करणाऱ्या मधमाशी पासून घेतले. मध जमा होईल आणि फुलाचा सुगंध कायम राहील. राजाचा मोठा पुत्र राजा होण्याची परंपरा चाणक्याने खंडित केल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, क्षमता आधारित व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राज्य चालविले जावे. हा विचार चाणक्य यांनी मांडला. तर शासन व्यवस्थेत भ्रष्टाचार हा शाश्वत आहे. तो दूर करण्यासाठी उपाय देखील सुचविले आहे.तसेच उत्पन्न कसे वाढवावे, विदेश व्यापार निती , देशाची सुरक्षा, साम, दाम, दंड, भेद या तंत्राचा वापर व्यक्ती ला मोठे करण्यासाठी नाही.तर राष्ट्र उभारणीच्या कमी वापरले जावे.ही चाणक्यानी शिकवण दिली असल्याचे त्यांनी सांगितले.तर विदेश व्यापारात देशाच्या हिताला प्राधान्य असावे.असे चाणक्यांनी 2300 वर्षांपूर्वी सांगितले आहे.