शेतकरी आंदोलनावरून RSS च्या नेत्यानं कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सुनावलं, म्हणाले – ‘सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय’

भाेपाळ : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्लीत कृषी कायद्यांच्या विराेधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदाेलनावरून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रघुनंदन शर्मा यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांच्या कार्यशैलीवर जाेरदार टीकास्त्र साेडले आहे. आज सत्ता तुमच्या डाेक्यात गेली आहे. तुम्ही जनाधार का गमावत आहात? काॅँग्रेसची धाेरणे आपण राबवत असून, ते आपल्या हिताचे नाही, असे खडे बाेल शर्मा यांनी सुनावले.
शर्मा यांनी पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की, सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. तुमचा हेतू शेतकऱ्यांना मदत करण्याचा असायला हवा. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. त्यांना तुमची मदत नकाे असल्यास हा चांगुलपणा काय कामाचा? त्यांना तसेच राहायचे असेल तर बळजबरी करून काय उपयाेग हाेणार आहे.देश बळकट करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करा अन्यथा आपल्याला पश्चाताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या यशाची फळे चाखत आहात, असे वाटत असेल तुम्ही चुकत आहात अशा शब्दात शर्मा यांनी तोमर यांना सुनावलं आहे.

शेतकऱ्यांना शांततेत निदर्शने करू द्यावीत
वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना शांततापूर्ण निदर्शने करू द्यावीत, त्यांना आंदोलनस्थळी इंटरनेटही उपलब्ध असावे, असे अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीने म्हटले आहे. या बैठकीला, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेर्मन, रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी स्टीव्ह चॅबॉट तसेच अमेरिकी काँग्रेस सदस्य आर. ओ. खन्ना उपस्थित होते.

हक्कांची गळचेपी नको : संयुक्त राष्ट्रे
भारतातील शेतकऱ्यांचे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक हालचालीवर सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक विभागानेही यावर भाष्य केले असू नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क शेतकऱ्यांना बजावू द्यावा, त्यांच्या मानवी हक्कांची गळचेपी करू नये असे भारताला सांगितले आहे. शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येकाचा व शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.