नाना पाटेकर यांच्या विरोधात अखेर तनुश्रीची पोलिसांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा

अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात अखेर अभिनेत्री तनुश्री दत्ताने मुंबईतील ओशिवरा पोलिसांकडे रितसर लेखी तक्रार दिली आहे. नाना पाटेकर यांच्या सह गणेश आचार्य यांच्या नावाचा देखिल या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. २००८ साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला होता. यानंतर तिला नाना पाटेकर यांनी नोटीस बजावली होती. या प्रकरणावरून सध्या बराच वादंग सुरू असून काही राजकीय पक्ष, बॉलिवूडमधील मंडळी नाना पाटेकर यांना क्लिनचीट देत आहेत. तसेच तनुश्रीवरच प्रतिआरोप केले जात आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df2e960a-c9f6-11e8-989c-65e2c949276f’]

या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर तनुश्रीने आता थेट पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात केली असून यामुळे नाना पाटेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांनी अशा प्रकारचे वर्तन केले नसल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्रीच्या आरोपानंतर नानांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर सांगितले होते की, त्या मुलीला समजलं पाहिजे की, ती काय बोलत आहे. एकदम ठिक होती ती मुलगी. मला समजलंच नाही की, हे काय होत आहे.

[amazon_link asins=’B0785B3W4F,B01LYHW5QV,B00HKX7JI6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef3fe5e4-c9f6-11e8-9cb9-af5a7abb2f9a’]

आम्ही रिहर्सल केली, माझा तो शेवटचा शॉट होता. कारण त्यानंतर माझे शूटींग संपणार होते. मी तिला म्हटले, मुली तू व्हॅनमध्ये बस, तोपर्यंत मी रिहर्सल करतो. कारण मी नाचू शकत नसल्यामुळे मला थोडी जास्त रिहर्सल करावी लागते. माझे ठिक झाल्यानंतर तू ये. त्यानंतर ती आलीच नाही. त्याचे कारणही मला माहिती नाही.

हडपसर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यासह पळालेला आरोपी गजाआड

त्यांच्या या प्रतिक्रियेनंतरही तनुश्रीने नानांवर आरोप करण्याचे थांबविले नाही. त्यामुळे नानांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानंतर आरोप मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असेही तनुश्री म्हणाली होती. त्याबद्दल पुन्हा नानांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले, तेव्हा नानांनी यावर, जो झुठ है वो झुठ ही है एवढेच उत्तर दिले आहे.