भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात; चौघांचा मृत्यू

ADV

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पिंपळास गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद केलीय. गोकूळ मधुकर गवते ( वय 29 वर्ष, रा. तरुवाडे , पिंपळगाव निफाड, नाशिक ) , पंकज भागीरथ जावळे ( वय 29 रा. सिन्नर ) कारचालक ज्वालाविजय बहादूर सिंग ( वय 27 , रा. नाशिक) गौरव सुधीर सिंग ( वय 27, रा. नाशिक ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती, हे चौघेही नाशिकहून ठाण्याकडे जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यामधील पिंपळास गावाजवळ आले असता कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यामधील दुभाजकावर आदळून डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला फेकली. त्याचवेळेस मुंबईहून नाशिककडे जाणार्‍या एका खासगी बस आणि या कारमध्ये जोरदार धडक झाली.

ADV

या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी बसचालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत.