खळबळजनक ! झोपेतच एकाच कुटुंबातील चौघांचे गळे चिरून हत्या, महाराष्ट्रातील घटना
मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – मनमाडमधील नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील वखारी इथे ही घटना घडली आहे. या भागात राहणार्या चव्हाण कुटुंबातील दोन लहान मुलांसह आई आणि वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामध्ये चार आणि सहा महिन्यांचा मुलांचा समावेश आहे.
चव्हाण कुटुंबीय हे घराबारे झोपलेले होते. काल मध्यरात्री हल्लेखोरांनी समाधान चव्हाण (वय 37) भरताबाई चव्हाण (वय 32) गणेश चव्हाण (वय 6) आरोही चव्हाण (वय 4) या चौघांची झोपेतच हत्याराने गळा चिरून हत्या केली. मारेकर्याने आईच्या शेजारीच झोपलेल्या आरोहीच्या गळ्यावर वार करून खून केला. एकाच कुटुंबातील चौघांचा खून का करण्यात आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.