मोहम्मद अनासची ४०० मीटर मध्ये सुवर्णमयी कामगिरी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

भारताचा धावपटू मोहम्मद अनास याने झेक रिपब्लिकमधील स्पर्धेत ४०० मीटरचे अंतर ४५.२४ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले आहे.

गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने ४५.३१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदक मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंगनंतर प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय या आधी मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’120b5d1e-8d98-11e8-81e5-c79f5275b9f2′]

दरम्यान, एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला. धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.