Gopichand Padalkar | ‘तो पर्यंत ST कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, शरद पवारांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय केलाय’ – गोपीचंद पडळकर (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. जवळपास एक महिना झाला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाच्या समर्थनार्थ भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत मुंबईत आझाद मैदानात (Azad Maidan) गेल्या 10 दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते आज संध्याकाळी पुण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला. तसेच एसटी महामंडळाचं जो पर्यंत राज्य शासनात विलनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे.

 

एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून सहभागी झालो आहे. सरकार वेडेपिसे झाले आहे. त्यांना सुचायचे बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) पायाखालची वाळू सरकली आहे. पवारांची मोठी मान्यताप्राप्त संघटना आहे. पवारांनी आजवर मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरुन कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. मात्र कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. जर प्रश्न मिटला तर पवारांच्या संघटनेचं दुकान बंद होईल, त्यामुळे निर्णय घेण्यास अडचण येत असल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार यांच्यावर केला.

 

 

म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु

चर्चा काय करायची? विलीनीकरण हीच मागणी. दोन बैठकांत कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं? एकच मागणी आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. रोज नव्या पुड्या सोडत आहे. कर्मचारी फुटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरु केली.

 

महामंडळ बापजाद्याची जहागिरी आहे का?

एसटीतला भ्रष्टाचार थांबवला तरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांइतका पगार मिळू शकेल. महामंडळ बापजाद्याची जहागिरी आहे का ? आम्ही दहा दिवस आझाद मैदानावर, तरीही चर्चेसाठी सापडत नाही? 38 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी दु:ख संपत नाही, हे दुर्दैवी ! संपाचे नेतृत्व कर्मचारी करत आहेत. आमची सरकारसोबत चर्चेची तयारी परंतु सरकारला मार्ग काढायचा नसल्याचे पडळकर यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री सांत्वनाचे दोन शब्द बोलले नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारने (Central Government) मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांवर (three agricultural laws) लगेच प्रतिक्रिया दिली. परंतु 38 मराठी कर्मचारी आत्महत्या करतात, त्यांच्या बायकांची कपाळे पांढरी झाले. त्यावर त्यांनी सांत्वनाचे दोन शब्द बोलले नाहीत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत खंत व्यक्त केली.

 

Web Title :- Gopichand Padalkar | ‘Until then, the strike of ST employees will continue, Sharad Pawar has done injustice to the employees’ – Gopichand Padalkar (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा